ऑस्ट्रेलियाला नमवित श्रीलंकेचा सुपर ८मध्ये प्रवेश, पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीने कांगारुंचा पराभव

नवी दिल्ली  : टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ३०व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिले. दव फॅक्टर लक्षात घेऊन श्रीलंकेने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्व गडी गमवून १८१ धावा केल्या. तसेच विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले. श्रीलंकेने हे आव्हान २ गडी गमवून पूर्ण केले. पाथुम निस्संकाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या विजयासह श्रीलंकेने सुपर ८ फेरीत जागा मिळवली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस नाही, पण चमत्कारीक गणित असेल. पण त्यात झिम्बाब्वेला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत सर्वाधिक संधी आहे. झिम्बाब्वे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकला की सुपर ८ फेरीत जागा मिळवेल.


श्रीलंकेने विजयाचा पाठलाग करताना पहिलीच विकेट ८ धावांवर गमावली. कुसल परेरा फक्त १ धाव करून तंबूत परतला. त्यानंतर पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने ९७ धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिस ५१ धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर पाथुमने पवन रत्नायकेसोबत खेळी पुढे नेली. या जोडीने हा खेळ संपवला. पाथुम निस्संकाने ५२ चेंडूत १०० धावा केल्या आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. यावेळी १० चौकार आणि ५ षटकार मारले.


ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचच्या शर्यतीत आता पथूम निसंकाही आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या लढतीत निसंकाने सर्वोत्तम कॅच टिपताना ग्लेन मॅक्सवेलला माघारी जाण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरूवातीनंतर मात्र मोठी धावसंख्या गाठता आली नाही.


मिचेल मार्शच्या वापसीने ऑस्ट्रेलिया बळ मिळालेले पाहायला मिळाले. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्यांना मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. हेडने २९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांनी ५६ धावांची खेळी करताना मार्शसोबत पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. दुशान हेमांथाने ही जोडी तोडली. मार्श-हेडने सेट केलेली गती कायम राखण्याच्या प्रयत्नात कॅमेरून ग्रीन ( ३) दुनिथ वेलालागेच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. ऑस्ट्रेलियाने सहा धावांच्या फरकाने दोन फलंदाज गमावले. हेमांथाने पुढील षटकात मार्शला पायचीत पकडले अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. मार्श २७ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. त्याने ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात सर्वाधिक चौकार मारले. पुढच्याच चेंडूवर जॉश इंग्लिसला यष्टिचीत करण्याची संधी यष्टिरक्षक कुसल मेंडिसने गमावली. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर फेकले. टीम डेव्हिडही ( ६) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कमिंदू मेंडिसला विकेट देऊन परतला. मॅक्सवेल पुन्हा एकदा कँडीवर वादळी खेळी करतोय असे दिसत होते, परंतु १७व्या षटकात हेमंथाच्या चेंडूवर त्याने मारलेला रिव्हर्स स्विप ऑस्ट्रेलियाला धक्का देणारा ठरला. पथून निसंकाने हवेत झेपावत अविश्वसनीय झेल टिपून मॅक्सवेलला माघारी पाठवले. मॅक्सवेल १५ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह २२ धावा केल्या. सलामीवीरांनी १०४ धावांची सलामी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखले. दुशान हेमंथाने तीन विकेट्स घेतल्या. ८१ धावांत ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स गमावल्या.

Comments
Add Comment

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे