Monday, February 16, 2026

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा? - थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी शिंदे समितीकडे पाठवण्याच्या राज्य सरकारच्या सूचना

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा? - थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी शिंदे समितीकडे पाठवण्याच्या राज्य सरकारच्या सूचना
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती 'शिंदे समिती'कडे पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व बँकांना दिल्या आहेत. यामुळे येत्या ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी मिळणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यातील विविध जिल्हा बँकांमार्फत जून २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या, सचिव, बँकेचे तपास अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्या माध्यमातून हे संकलन सुरू आहे. या प्रक्रियेत सहनिबंधक आणि निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचेही सहकार्य घेतले जात आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा झाल्यास नेमकी किती आर्थिक तरतूद करावी लागेल, यासाठी ही अचूक आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.

शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडे

राज्यात गेल्या काही काळापासून नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >