मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं
या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसच्या या विधानाला तुम्ही पाठिंबा देता का? तुमच्या कथित हिंदुत्वाच्या व्याख्येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बसतो काय? घराबाहेर या, महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभे राहा आणि स्पष्ट उत्तर द्या.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत तडजोड, तुलना किंवा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. जो कोणी त्यांच्या तेजस्वी इतिहासाला धक्का देईल, त्याला महाराष्ट्राची जनता योग्य जागा दाखवेल.







