रिलायन्सला मिळाला व्हेनेझुएलातून तेल खरेदीचा परवाना

मुंबई : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अमेरिकेने लष्करी बळावर अपहरण केले. यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी सरकारी आणि खासगी कंपन्यांना परवाने देण्यास सुरुवात केली आहे. भारतातल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळाल्यामुळे भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी व्हेनेझुएलात तेलाचे उत्खनन करू शकेल.


व्हेनेझुएलाच्या तेलात सल्फरचे प्रमाण जास्त आहे. या तेलाचे शुद्धीकरण करण्याचे तंत्रकौशल्य रिलायन्सच्या रिफायनरीकडे आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला परवाना मिळवणे सोपे झाले. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या रिफायनरी व्हेनेझुएलाच्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी सर्वाधिक सक्षम आहेत. यामुळे व्हेनेझुएलाचे स्वस्त तेल शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भारतात येण्याची शक्यता आहे. शुद्धीरणानंतर हे तेल भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी जाईल. यामुळे भारतातील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.


व्हेनेझुएलातून भारतापर्यंत कच्च्या तेलाचा पुरवठा विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे. एप्रिल २०२६ पासून व्हेनेझुएलाचे तेल मोठ्या प्रमाणात शुद्धीरणासाठी भारतात येणार आहे. सूत्रांच्या मते व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलामुळे रिलायन्सला मोठा आर्थिक फायदा अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर रचत भारताने डाव घोषीत केला

न्यू चंदिगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची धुलाई

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Israel : इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल यांच्यातील सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांना लवकरच नवी बळकटी मिळणार आहे.

Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध

Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली