कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी एआय फॉर अॅग्री २०२६ ही जागतिक परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. एआय फॉर ॲग्री ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (एडीबी), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रापीक्स (आयसीआयएसएटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), एम.एस.स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ च्या अंमलबजावणीकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या एआय धोरणाच्या निर्मितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची प्रेरणा मिळाली. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आदींसाठी एक व्यासपीठ म्हणून परिषदेचा उपयोग करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने महाकृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महा एजीएक्स (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज), एआय-सक्षम ट्रेसिबिलिटी प्रणाली, एआय आधारित भू-स्थानिक बुद्धिमत्ता इंजिन, शेतकरी-केंद्रित एआय सल्ला मंच-महाविस्तार या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक केंद्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यरत असून, शासनाने पहिल्या टप्प्यात रुपये 500 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.

एआय फॉर ॲग्री २०२६

एआय फॉर ॲग्री २०२६ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित, समावेशक, हवामान-संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित कृषी परिवर्तनाला चालना देणारे हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे ‘एआय अॅग्री २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये धोरणकर्ते,आंतरराष्ट्रीय संस्था,शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी समुदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही परिषद डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम कृषी परिसंस्था निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे त्यामुळे शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे त्यांच्यासाठीही या परिषदेमध्ये माहितीपूर्ण संवादसत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

विविध चर्चासत्रांचे आयोजन

एआय फॉर ॲग्रीमध्ये दोन दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये कृषी व अन्न प्रणाली परिवर्तनासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता : सक्षमीकरण, समता आणि नेतृत्व, ॲग्री एआयसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा: डेटा, विश्वास, ट्रेसिबिलिटी आणि प्लॅटफॉर्म्स, ॲग्री एआय मधील गुंतवणूक : बाजारपेठा आणि विस्तारक्षम नवोन्मेष, जागतिक वैज्ञानिक सहकार्य आणि एआय फॉर ॲग्री संशोधन नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, धोरणात्मक मार्ग आणि जागतिक प्रशासन याविषयाचा समावेश %
Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवताना दगडफेक; ४ पोलीस, ६ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :