मुंबई : राज ठाकरे यांच्या पोस्टची दखल घ्यावी असे विशेष त्यात काही नाही. पण काही तरी घडत असताना.. आपल्या स्वभावाप्रमाणे स्वतःची दखल घेतली जावी, मी कसा यात नाही? आणि म्हणूनच तर ही पोस्ट लिहिली गेली नाही ना? असे वाटावे अशीच ती पोस्ट आहे. असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्याकरता आणि युनेस्को मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे उभारण्यात आलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी फ्रान्सला जाताना तसेच बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जात असताना, माझ्या लक्षात आले की, मराठी भाषा, महाराष्ट्रातील कला लोककला, लोक परंपरा, समृद्ध बोली भाषा, लोकसंस्कृती, लोकदैवते, महाराष्ट्राची आद्य व वंदनीय प्रतीके, जाज्वल्य इतिहास आणि अखंड परंपरा.... यांच्यासाठी काही करुन दाखवले का? की फक्त पोस्ट लिहून प्रसिद्धी मिळवणारे ही महाराष्ट्रातील नेते आणि पक्ष आहेत, याची जाणीव काही संवेदनशील मनांना करुन द्यावी म्हणून आज थोडे लिहूनच टाकावे असे ठरवले म्हणून हा अक्षरप्रपंच.
आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात देशभरात चालणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबईतल्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवतजी यांचे निमंत्रितांच्या नियोजित कार्यक्रमात व्याख्यान झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे नेमके काय काम करतोय, आमच्यासमोर उद्दिष्टे काय आहेत, देशाची आजची आवश्यकता काय आहे, देशाची मार्गक्रमणा कशी झाली पाहिजे, या विषयावरच्या व्याख्यानमालेचा होता.
म्हणूनच सुरुवातीला हे स्पष्ट करावं लागेल की, मोहन भागवतजी यांनी ठळकपणे मांडले की, मातृभाषेतच शिक्षण दिले गेले पाहिजे, घरातदेखील मातृभाषेतच बोललं गेलं पाहिजे.
आता राज ठाकरे तुम्ही खरेच मराठी भाषेचे प्रेमी असता तर तुम्ही या विषयावर संघाच्या या भूमिकेचे कौतुकच करायला हवे होते. पण.एवढा मनाचा मोठे पणा कुठून आणणार ? हाही प्रश्न आहे. खरं तर आज जगातील सर्वात मोठी तसेच शंभर वर्षे पूर्ण करणारी, देशसेवा करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना महाराष्ट्राच्या मराठी मातीत







