नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना आता कधीही काढता येणार आहेत. एप्रिल २०२६ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.


तुमच्या हक्काच्या EPFO मधील पैसे काढण्यासाठी आता क्लेम फॉर्म भरून दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या ८ कोटी सदस्यांसाठी 'EPFO 3.0' अॅपमध्ये हे महत्त्वाचं आणि नवीन अपग्रेड आणत आहे. या अंतर्गत एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केला जाईल, ज्याद्वारे सदस्य थेट UPI वापरून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.


पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे. नव्या नियमांनुसार, सदस्य आपल्या युपीआय पिनचा वापर करून लिंक केलेल्या बँक खात्यात तात्काळ पैसे वळवू शकतील. आजारपण, लग्न, शिक्षण किंवा घराच्या कामासाठी लागणारा पैसा आता अवघ्या तीन दिवसांत हातात येईल. विशेष म्हणजे, हे काम स्वत: वापरकर्ता करु शकणार आहे.


युपीआयद्वारे पैसे काढताना एका व्यवहारासाठी २५ हजार रुपयांची मर्यादा असण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतरची सुरक्षा जपण्यासाठी तुमच्या एकूण बॅलन्सपैकी किमान २५ टक्के हिस्सा 'लॉक' राहील, तर उर्वरित मोठा हिस्सा तुम्ही गरजेनुसार काढू शकाल. लांबच लांब क्लेम प्रोसेसऐवजी आता थेट डिजिटल सेटलमेंटवर भर दिला जाईल.

Comments
Add Comment

Nitesh Rane: सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू - मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

सरसंघचालकांच्या उद्बोधनावर ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर मुंबई : “सलमान खान हा उद्धव

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना सुनेत्रा पवार भावूक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात!

रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी 'एमआयडीसी' रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा

महाराष्ट्राच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 'हे' महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुंबई : नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. यातून ५७ अपूर्ण

राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा, अपघात रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे कडक निर्देश

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी