मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.
दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी:
छत्रपती संभाजी नगर :
भाजप- १६, शिवसेना- १८, राष्ट्रवादी काँग्रेस- ४
धाराशिव:
भाजप- ८, शिवसेना- १२, राष्ट्रवादी काँग्रेस- ३
कोल्हापूर:
भाजप- १०, शिवसेना- ८, राष्ट्रवादी काँग्रेस- १०
लातूर:
भाजप- ८, शिवसेना- ०, राष्ट्रवादी काँग्रेस- २
परभणी:
भाजप- १७, शिवसेना- ३, राष्ट्रवादी काँग्रेस- ६
पुणे:
भाजप- २०, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- २७
रायगड:
भाजप- ६, शिवसेना- १३, राष्ट्रवादी काँग्रेस- १०
रत्नागिरी:
भाजप- २, शिवसेना- २६, राष्ट्रवादी काँग्रेस- २
सांगली:
भाजप- ८, शिवसेना- ५, राष्ट्रवादी काँग्रेस- ३
सातारा:
भाजप- ३२, शिवसेना- १०, राष्ट्रवादी काँग्रेस- १७
सिंधुदुर्ग:
भाजप- १९, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- ०
सोलापूर:
भाजप- २१, शिवसेना- ४, राष्ट्रवादी काँग्रेस- ९







