मुंबईचा ‘रणजी’तील प्रवास थांबला!

मुंबई  : के.एल. राहुल आणि रवीचंद्रन स्मरण यांच्या दमदार खेळींच्या बळावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेत ४२ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईला ४ विकेट्सनी नमवले. या पराभवासह मुंबईचं यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले.


बीकेसी इथल्या शरद पवार क्रिकेट अकादमी इथे झालेल्या लढतीत, मुंबईचा पहिला डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला. मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्यक होती. कर्नाटकच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. सलामीवीर अखिल हेरवाडकरने ६० धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सर्फराझ खान दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळू शकला नाही. अनुभवी अजिंक्य रहाणेने वैयक्तिक कारणास्तव रणजी करंडक स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यशस्वी जैस्वाल (५), मुशीर खान (१), क्रायसिस मॅन म्हणून प्रसिद्ध सिद्धेश लाड (१२) धावा करू शकले. शम्स मुलानी, शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच दिवशी झटपट बाद होणे मुंबईला चांगलेच महागात पडले. कर्नाटकतर्फे विदवत कावेरप्पा, प्रसिध कृष्णा आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.


कर्नाटकच्या फलंदाजांनाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. मयांक अगरवालच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने १७३ धावांची मजल मारत अल्प आघाडी मिळवली. के.एल.राहुलने २८ धावा करत मयांकला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद वगळता कर्नाटकच्या बाकी फलंदाजांनी हाराकिरी केली. मुंबईतर्फे मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ४ विकेट्स पटकावल्या.


मुंबईचे ३२५ धावांचे लक्ष्य


मुंबईने दुसऱ्या डावात पहिल्या डावातल्या चुका टाळत खेळ केला. मुंबईने दुसऱ्या डावात ३७७ धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज आकाश आनंदने सर्वाधिक ७० धावा केल्या. मुशीर खान (४९), तनुष कोटियन (४८) आणि तुषार देशपांडे (४७) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. मुंबईने कर्नाटकसमोर ३२५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.


रवीचंद्रन स्मरणने डाव सावरला


या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने मयांकर अगरवालला झटपट गमावले. देवदत्त पड्डीकल ३९ धावा करून बाद झाला. करुण नायर १३ धावा करून तंबूत परतला. मात्र के.एल.राहुलने एका बाजूने नांगर टाकून मॅरेथॉन खेळी साकारली. राहुलने १४ चौकार आणि एका षटकारासह १३० धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर रवीचंद्रन स्मरणने सूत्रे स्वीकारली. स्मरणने नाबाद ८३ तर विद्याधर पाटीलने ३१ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सध्या लंडनच्या

Ind vs Eng : भारताच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल! जसप्रीत बुमराह संघातून बाहेर; नेमकं कारण काय ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा आनंद लुटता यावा म्हणून केरळ सरकारने घेतला थेट 'हा' निर्णय 

केरळ : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा परिणाम केरळवरही

FIFA World Cup 2026 : अंतिम सामन्यात अर्जेंटिना-स्पेन आमने सामने; ९६ वर्षांनंतर स्पॅनिश भाषिक देशांमध्ये ऐतिहासिक फायनल सामना

न्यू जर्सी : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. हा सामना केवळ

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर