मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. सुरुवातीच्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने ७० जागांवर आघाडी घेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (३८ जागा) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (४३ जागा) मोलाची साथ दिली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी सुरुवातीचे कल चिंतेचे ठरणार असे दिसत आहे. यामध्ये काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अनुक्रमे ६ आणि ३ जागांवर मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर आणि छत्र
सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी
भाजप- ७० शिवसेना शिंदे गट- ३८ राष्ट्रवादी अजित पवार गट- ४३ काँग्रेस- २१ शिवसेना ठाकरे गट- १४ राष्ट्रवादी शरद पवार गट- ३ इतर- ११
मुंबई: महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मतमोजणी (सोमवार ९ ...
कोकणात महायुतीचा ‘डंका’
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकण पट्ट्यात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण होण्याआधीच महायुतीच्या तब्बल २७ उमेदवारांनी बिनविरोध विजय संपादन करत विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील ५० सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ असे एकूण ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पंचायत समितीमध्ये तर महायुतीने मोठी मजल मारली असून, १०० पैकी १७ जागा आधीच खिशात घातल्या आहेत. यात भाजपचे १६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून शिंदे गटाला १ जागा मिळाली आहे. सिंधुदुर्गाप्रमाणेच रायगड आणि रत्नागिरीतही शिवसेनेने (शिंदे गट) बाजी मारली आहे. रायगडच्या महाडमधील सवाने धामणे गणातून अनिल जाधव यांच्याविरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला. रत्नागिरीमध्ये नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी माघार घेतल्याने आणि महायुतीची भक्कम रणनीती यामुळे मतदानापूर्वीच कोकणात महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे.







