Sunday, February 8, 2026

Jalna Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने १६ जण रुग्णालयात, जालन्यात नेमकं घडलं काय?

Jalna Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने १६ जण रुग्णालयात, जालन्यात नेमकं घडलं काय?

जालना: जालन्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल १५ ते १६ जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यात लहान मुलांचाही समावेश असून सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे

जालन्यात फूड पॉइझनिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे.

नेमकं घडलं काय?

टट्टूपुरा भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरी विक्रीसाठी गाडा लावला होता. परिसरातील लहान मुलांसह काही नागरिकांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांना अशक्तपणा जाणवू लागला. त्रास वाढत गेल्याने रात्री उशिरा बाधित नागरिकांना शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक तपासणीत पाणीपुरी खाल्ल्यामुळेच फूड पॉइझनिंग झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात असून महापालिका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील फेरीवाल्यांची तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >