Sunday, February 8, 2026

IND vs USA T20 : भारतीय संघाचं टेन्शन संपलं, पहिल्या विजयानंतर काय म्हणाला कॅप्टन सूर्यकुमार यादव?

IND vs USA T20 : भारतीय संघाचं टेन्शन संपलं, पहिल्या विजयानंतर काय म्हणाला कॅप्टन सूर्यकुमार यादव?

मुंबई: टी- ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात शनिवारी पाकिस्तानच्या विजयाने झाली तर रात्री झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएसएविरुद्ध 29 धावांनी विजय नोंदवला अन् वर्ल्ड कपच्या विजयाचा नारळ फोडला आहे. परंतु वानखेडेवर झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाची मोठी फजिती झाली होती. कॅप्टन सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला सावरलं अन् मॅच जिंकवून दिली. अशातच मॅच संपल्यावर सूर्याने आनंदाची बातमी दिली आहे.

टॉस जिंकून युएसएने टीम इंडियाला जमिनीवर आणलं. भारताची अवस्था एका वेळी 77 धावांवर 6 विकेट्स अशी बिकट झाली होती. तिथून सूर्याने मॅच काढली अन् 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यामुळे बॉलर्सला फाईट करायला संधी मिळाली अन् टीम इंडियाने मॅच जिंकली. मुंबईच्या आझाद मैदान आणि क्रॉस मैदान अशा मैदानांवर मी खूप क्रिकेट खेळलो असल्याने मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता, असे सूर्याने सांगितले. यावेळी सूर्याने एका खेळाडूविषयी खुलासा केला.

कॅप्टन सूर्या वॉशिंग्टन सुंदरवर काय म्हणाला ?

 

खेळाडूंच्या इंज्युरी अपडेट देताना सूर्याने सांगितलं की, वॉशिंग्टन सुंदर आता फिट असून तो दिल्लीत टीमसोबत सामील होईल. जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा यांना वातावरणातील बदलामुळे ताप आला होता. सध्या सर्व काही ठीक आहे. आता पुढच्या मॅचसाठी 5 दिवसांचा वेळ असून भारतीय संघ अधिक जोमाने मैदानात उतरेल, असा विश्वास कॅप्टन सूर्याने चाहत्यांना दिला.

दरम्यान वानखेडेची खेळपट्टी आज नेहमीपेक्षा थोडी वेगळी होती, असंही सूर्याने स्पष्ट केलं. सकाळी सूर्यप्रकाश कमी असल्याने पिच रोलिंग आणि पाणी देण्याच्या कामात मर्यादा आल्या असाव्यात, असं त्याने नमूद केलं. क्युरेटरने त्यांचे प्रयत्न केले असले तरी, निसर्गाच्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात, त्यामुळे आम्ही पिचचे कारण देऊन आमची खराब बॅटिंग लपवू शकत नाही, असंही सूर्याने प्रामाणिकपणे मान्य केलं आहे.

Comments
Add Comment