Sunday, February 8, 2026

लग्नाचं आमंत्रण देत असलेल्या कुटुंबाला ऑडीने चिरडलं, ३ जणांचा मृत्यू

लग्नाचं आमंत्रण देत असलेल्या कुटुंबाला ऑडीने चिरडलं, ३ जणांचा मृत्यू

रेवा : मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यात ऑडी कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी एका ठिकाणी जात होते. मृतांची ओळख पटली आहे. भागवत विश्वकर्मा (५५), त्यांचा मुलगा शिवम आणि शीतल विश्वकर्मा अशी मृतांची नावं आहेत.

भागवत यांच्या मोठ्या मुलाचे लग्न २४ फेब्रुवारी रोजी होणार होते. याच लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी विश्वकर्मा कुटुंब एका ठिकाणी जात होतं त्यावेळी ऑडीने उडवलं. घरापासून फक्त २ किमी अंतरावर रेवा-प्रयागराज महामार्गावरील कोस्टा गावाजवळ अपघात झाला.

प्रयागराजकडून येणाऱ्या एका भरधाव ऑडी कारने दुचाकीला उडवले. यात विश्वकर्मा कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. अपघातात बाईक चेंदामेंदा झाली. पोलिसांनी अपघात प्रकरणी ऑडी कारच्या चालकाला पकडले आहे.

भागवत आणि शिवम हे चाचईचे रहिवासी होते, तर शीतल जवळच्या राथरा येथे वास्तव्यास होती. या सर्वांचा अपघाती मृत्यू झाला. नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. नातलगांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. विश्वकर्मा कुटुंबियांचे नातलग संजय गांधी रुग्णालयात पोहोचले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >