मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) याची माहिती दिली आहे. त्या यावेळी म्हणाल्या की; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने काही महिलांना योजनेचा लाभ मिळणं बंद झालं होतं. पण आता या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे ?
e-KYC प्रक्रियेत नेमकी चूक काय झाली ?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी! e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप… pic.twitter.com/tggmXwgtOa
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 6, 2026
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी e-KYC प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रश्न असा होता: "तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना?" या प्रश्नाचे उत्तर देताना असंख्य महिलांनी चूक केली. प्रश्न न समजल्याने काही महिलांने या प्रश्नाचे उत्तर 'नाही' ऐवजी 'हो' दिले होते. याचा अर्थ असा झाला की संबंधित महिलेनं मान्य केले की त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे. नियमानुसार घरातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे संगणकीय प्रणालीनुसार लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते येणे आपोआप बंद झाले.
“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही” - देवेंद्र फडणवीस
“निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.







