Friday, February 6, 2026

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रंगलेला खेळ निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. निवडणुका झाल्या पण आता महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी महापालिकेत रंगलेले नाट्य पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असेच काहीसे घडले आहे. अमरावती महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक झाली. महापौर होण्यासाठी उमेदवाराला बहुमताची आवश्यकता होती.

अमरावती महापालिकेत एकूण ८७ जागा आहेत. भाजप १५, युवा स्वाभिमान पार्टी ( रवी राणा यांचा पक्ष) १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) ११, शिवसेना ३ असं एकूण ५४ नगरसेवकांचा संख्याबळ भाजपकडे आहे. अशा परिस्तिथीत श्रीचंद तेजवानी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र एमआयएमच्या नगरसेविकेने त्यांना मतदान केल्याने भाजपचे संख्याबळ अधिकच वाढले आहे.

एमआयएममध्ये खळबळ

एमआयएमच्या नागरसेविकेने भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे पक्षांतर्गत शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपने एमआयएमची एक नगरसेविका फोडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सभागृहात लीलाबाई कांबळे यांनी श्रीचंद तेजवानी यांना पाठिंबा देत हात उंचावला त्यावेळी सर्व अचंबित झाले . एमआयएमचे इतर नगरसेवक त्यांना हात खाली करण्यासाठी सांगत होते. पण लीलाबाई कांबळे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या.

Comments
Add Comment