नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.
पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.
यावेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे रेखाचित्र, स्वतः मुलांनी बनवलेले पुष्पगुच्छ आणि त्रिपुरातील नारळाच्या लाकडापासून बनवलेली सतार, सेंद्रिय चहा (यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की ते चहा विक्रेत्याला चहा देत आहेत) आणि आसाममधील गमछा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
A wonderful discussion with students on approaching exams with confidence and positivity. Do watch this very special episode of Pariksha Pe Charcha!#ParikshaPeCharcha26 https://t.co/k7IN79qvek
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2026
अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची:
परीक्षा पे चर्चा २०२६ या पर्वातून अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची आहे यावर भर दिला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ५ कानमंत्र दिले आहेत. तसेच परीक्षेला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही परीक्षेत तुमची सर्वोत्तम कामगिरी साध्य करू शकता.
पंतप्रधान मोदींनी दिले विद्यार्थ्यांना हे ५ कानमंत्र
- परीक्षांना उत्सवासारखे मान द्या.
- इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा.
- तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर करा.
- कठीण कामांना प्रथम सामोरे जा.
- पोपट नाही तर परीक्षा योद्धा बना.






