Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद'च्या टॉप कमांडरसह दोन पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका गुहेत अडकलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरसह दोन पाकिस्तानी दहशदवाद्यांचा बुधवारी (४ फेब्रुवारी) खात्मा करण्यात आला. दुपारी १२ वाजता सैन्याने गुहेत घुसखोरी केली तेव्हा अनेक मोठे स्फोट ऐकू आले.


अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक रुबानी उर्फ ​​अबू माविया होता, जो जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक टॉप कमांडर होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सक्रिय होता.



भारतीय सैन्याचे ऑपरेशन "किया" यशस्वी:


मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता रामनगर-बसंतगड परिसरातील वरच्या भागात सैन्याकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत असताना, लष्कराने, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी दहशतवाद्यांचा माग काढला. त्यानंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. तब्बल २० तासांहून अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनला सैन्याने "किया" (operation "KIA") असे नाव दिले आणि ते संपल्याचे सांगितले.


एका दहशतवाद्याचा मृतदेह गुहेच्या तोंडाशी आढळला, तर दुसऱ्याचा मृतदेह गुहेच्या आत खोलवर आढळला.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात