Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद'च्या टॉप कमांडरसह दोन पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका गुहेत अडकलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरसह दोन पाकिस्तानी दहशदवाद्यांचा बुधवारी (४ फेब्रुवारी) खात्मा करण्यात आला. दुपारी १२ वाजता सैन्याने गुहेत घुसखोरी केली तेव्हा अनेक मोठे स्फोट ऐकू आले.


अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक रुबानी उर्फ ​​अबू माविया होता, जो जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक टॉप कमांडर होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सक्रिय होता.



भारतीय सैन्याचे ऑपरेशन "किया" यशस्वी:


मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता रामनगर-बसंतगड परिसरातील वरच्या भागात सैन्याकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत असताना, लष्कराने, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी दहशतवाद्यांचा माग काढला. त्यानंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. तब्बल २० तासांहून अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनला सैन्याने "किया" (operation "KIA") असे नाव दिले आणि ते संपल्याचे सांगितले.


एका दहशतवाद्याचा मृतदेह गुहेच्या तोंडाशी आढळला, तर दुसऱ्याचा मृतदेह गुहेच्या आत खोलवर आढळला.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची