Friday, February 27, 2026

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेपूर्वी ताण हटणार !

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेपूर्वी ताण हटणार !

यवतमाळ : दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास व परीक्षेसंदर्भातील अडचणी, शंका किंवा समस्या दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, तणावमुक्त होता यावे या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घेता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सकारात्मक मानसिकतेने आणि तयारीसह सामोरे जाणे आवश्यक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील शंका मिटविण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.

यासाठी राज्य बोर्डाने ही हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८९३७५६) तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८८१०७५) हे क्रमांक दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >