भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला ईदगाह परिसरात खेळताना श्वानाने हल्ला करून जखमी केले होते. रेबिजची लस देण्यात आली होती. ३१ जानेवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले. २८ जानेवारी रोजी पुन्हा दाखल करण्यात आले आणि कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले. आमदार रईस शेख यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, वेळेत व योग्य उपचार न झाल्यामुळे मुलाचा जीव गेल्याचा दावा करत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने हमीदला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता; मात्र कुटुंबीयांनी त्याला घरी नेले. नंतर उशिरा तो गंभीर अवस्थेत परत आला. उपचार करण्यात आले, त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






