भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी देशाने बजेटमध्ये केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारने संरक्षण खर्चात भरघोस वाढ केली आहे. यात सैन्य दलांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने २.१९ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या यंदाच्या भांडवली खर्चासाठी १.८ लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. कॅपेक्स वाटपांमध्ये विमान आणि एरो इंजिनसाठी ६३ हजार ७३३ कोटी रुपयांची तरतूद आहे.





देखभाल, दारूगोळा, इंधन, दुरुस्ती इत्यादी आवर्ती खर्च आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पगार यासह दैनंदिन कामकाजासाठी राखून ठेवलेला संरक्षण अर्थसंकल्पातील भाग - १७.२४ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. निवृत्ती वेतन अर्थात पेन्शनसाठीच्या निधीत ६.५३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यंदा संरक्षण क्षेत्रात निवृत्ती वेतन अर्थात पेन्शनसाठी १.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे यंदा वर्षभरासाठीचे संरक्षण विभागाचे बजेट ७.८५ लाख कोटींच्या घरात गेले आहे.


यंदाच्या बजेटद्वारे केंद्र सरकारचा नवी शस्त्र खरेदी करणे तसेच देशाला निवडक शस्त्रांच्या क्षेत्रात वेगाने आत्मनिर्भर करणे हा उद्देश दिसतो. यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बजेटमधील संरक्षणासाठीच्या तरतुदींचे स्वागत केले. बजेटमध्ये संरक्षण साहित्याच्या देखभाल दुरुस्तीसाठीही मोठी तरतूद केली आहे. विमानांच्या भागांच्या निर्मितीसाठी आयात केलेल्या कच्च्या मालावरील मूलभूत सीमाशुल्क माफ करण्याचा प्रस्ताव सीतारमण यांनी आपल्या भाषणात मांडला. संरक्षण साहित्याच्या निर्यातीतून उत्पन्न कमावण्याकडेही सरकारचा कल दिसून येत आहे.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि