नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडण्यात आला आहे. ग्रामीण ते शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, शिक्षणाला चालना मिळावी आणि कौशल्याधारित शिक्षण मजबूत व्हावे, हा या तरतुदींचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षणाबत केल्या गेल्या 'या' तरतुदी
खगोलशास्त्राला चालना देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.
डिजिटल शिक्षण अधिक मजबूत करून हस्तलिखितांना देखील प्रोत्साहन दिले जाईल.
हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत ट्रेकिंगची व्यवस्था करणार आहेत.
पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधणीसाठी योजना देखील सुरु केली जाईल, तसेच प्रयोगशाळांना अधिक सुसह्य केले जाईल
भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, देशात ५ प्रादेशिक केंद्रे स्थापन करण्यास राज्यांन मदत करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात मांडला आहे.
कंटेन्ट क्रिएटिव्ह लॅब
निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, अनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रातील भरभराट लक्षात घेता, १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये AVGC 'कंटेंट क्रिएटर लॅब्स' स्थापन करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजला मदत देण्याचा प्रस्ताव आहे. अर्थसंकल्पात मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला १५,००० माध्यमिक शाळांमध्ये 'कंटेंट लॅब्स' स्थापन करण्यासाठी मदत देण्याचा प्रस्ताव आहे. क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला.






