नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी असा विक्रम कोणाच्याही नावावर नव्हता. विशेष म्हणजे, तब्बल २६ वर्षांनंतर प्रथमच देशाचा अर्थसंकल्प रविवारी सादर केला जात आहे, ज्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी १९९९ मध्ये अर्थसंकल्पाचा दिवस रविवारी आला होता, मात्र तेव्हा तो शनिवारीच सादर करण्यात आला होता. यंदा मात्र रविवारीही संसदेचे कामकाज सुरू ठेवून हा ऐतिहासिक पायंडा पाडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून प्राप्तिकर (Income Tax), रेल्वे विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या मोठ्या घोषणा होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार की नवीन योजनांची घोषणा होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
पारंपारिक औषध, पशुपालन आणि संत्रा अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव पारंपारिक औषधांमध्ये पुराव्यावर आधारित संशोधन, प्रशिक्षण आणि जागरूकता मजबूत करण्यासाठी सरकार नवीन प्रयत्न करेल. पशुपालन क्षेत्रात शिक्षण आणि सेवा वाढविण्यासाठी २०,००० हून अधिक व्यावसायिकांची भरती केली जाईल. खाजगी पशुवैद्यकीय आणि पॅराव्हेटेरनरी महाविद्यालये, रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि प्रजनन सुविधांना पाठिंबा देण्यासाठी कर्ज-संलग्न भांडवली अनुदान योजना सुरू केली जाईल.
पशुपालनात प्रगत तंत्रज्ञान आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी सरकार भारतीय आणि परदेशी संस्थांमधील सहकार्याला देखील प्रोत्साहन देईल. भारताच्या संत्रा अर्थव्यवस्थेला, ज्यामध्ये अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्रांचा समावेश आहे, त्यांना देखील पाठिंबा मिळेल.
देशभरात ५ ठिकाणी मेडिकल हब तयार करणार देशभरात ५ ठिकाणी मेडिकल हब तयार करणार आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या नव्या संस्था स्थापन करणार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार विविध क्षेत्रात पशुवैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य देणार भारताला मेडिकल टुरिझम बनवणार कोव्हिडनंतर योग आणि आयुर्वेदाला जगभरात मान्यता
हस्तकला वस्त्रोद्योगांना बळकटी देण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खादी आणि हस्तकला वस्त्रोद्योगांना बळकटी देण्यासाठी योजना प्रस्तावित केली. वस्त्रोद्योग कामगार प्रोत्साहन योजना आणि राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रम (NHHP) देखील जाहीर करण्यात आला. आव्हानांवर आधारित मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम देखील सुरू केला जाईल.
देशभरात सात उच्चगती रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात देशभरात सात उच्चगती रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये मुंबई–पुणे, पुणे–हैदराबाद, हैदराबाद–चेन्नई, दिल्ली–वाराणसी आणि वाराणसी–सिलीगुडी या महत्त्वाच्या शहरांमधील मार्गांचा समावेश आहे. या उच्चगती रेल्वे प्रकल्पांमुळे शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, दळणवळण अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच रोजगारनिर्मितीलाही गती मिळेल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.
लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) प्रोत्साहन देणेआयकर २०२६ लाईव्ह: सरकारने १०,००० कोटी रुपयांचा समर्पित एसएमई ग्रोथ फंड सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या फंडाचे उद्दिष्ट लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) प्रोत्साहन देणे आणि भविष्यातील रोजगार निर्मिती करणे आहे. या फंडांतर्गत, काही निकषांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन आणि मदत दिली जाईल.
अर्थमंत्र्यांकडून पुणेकरांना गिफ्ट हायस्पीड रेल्वे कॉरिडोअर
मुंबई-पुणे पुणे-हैदराबाद
२०० वारसा औद्योगिक क्लस्टर्सचे पुनरुज्जीवन भारतामध्ये क्रीडा साहित्याचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे.२०० वारसा औद्योगिक क्लस्टर्सचे पुनरुज्जीवन
हातमागासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज योजना राबवणार हातमागासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज योजना राबवणार 12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरू मेगा टेक्स्टाइलची उभारणी करणार
पायाभूत सुविधांसाठी अर्थमंत्र्यांची घोषणा ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा राबवणार १२.२ लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरले जाणार
कॅन्सर, मधुमेहावरील औषधं स्वस्त करणार कॅन्सर, मधुमेहावरील औषधं स्वस्त करणार, सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी ४० हजार कोटींची तरतूद
अर्थमंत्री सीतारमण यांनी बायोफार्मा धोरण प्रस्ताव ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे आरोग्य प्रगतीसाठी बायोफार्मा धोरण आरोग्यसेवेतील भारताची डिजिटल परिसंस्था मजबूत करेल, असे अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण म्हणाल्या.






