Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात 'या' तीन कर्तव्यांवर भर

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.


यावर्षीचा अर्थसंकल्पामधून तीन मुख्य कर्तव्यांवर भर देण्यात आला आहे. तसेच यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.


बजेटमध्ये भर देण्यात आलेले तीन कर्तव्य :


१. पहिले कर्तव्य - आर्थिक विकासाला वेग देणे आणि स्थायी आर्थिक विकास करणे :
आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि तो कायम ठेवणं. यासाठी उत्पादकता आणि स्पर्धा वाढवणं. तसेच जागतिक स्तराच्या सुविधा उपलब्ध करणं.


२. दुसरे कर्तव्य - नागरिकांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे:
आपल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यांचं कौशल्य तसेच क्षमता वाढवणं. तसेच भारताच्या प्रगतीत त्यांचा समावेश करून घेणं.


३. तिसरे कर्तव्य - सबका साथ सबका विकास या विकास या धोरणाला अनुकूल निर्णय घेणार:
सबका साथ - सबका विकास या तत्वावर आधारित विकास साध्य करणं. यातून प्रत्येक समाज, कुटुंब, प्रदेश यांना साधन-संपत्ती, सुविधा आणि संधी समप्रमाणात उपलब्ध असतील.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये