केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२६ जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी बोलतांना आजचा बजेट हा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
आजचा बजेट हा महिलांच्या शक्तीचे प्रतिबिंब आहे. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम केला आहे.
The Union Budget reflects the aspirations of 140 crore Indians. It strengthens the reform journey and charts a clear roadmap for Viksit Bharat.#ViksitBharatBudget https://t.co/26hIdizan9
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2026
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की; "हा बजेट म्हणजे अनेक संधींसाठी महामार्ग आहे. हा युवा शक्तीचा बजेट आहे. यात तरुण विचार आणि तरुण स्वप्ने आहेत. हा बजेट स्वावलंबी भारताला नवे पंख देणारा आहे.
तसेच पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत. समर्पित फ्रेट कॉरिडॉर, देशभरातील जलमार्गांचा विस्तार हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, टियर २ आणि टियर ३ शहरांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करणे आणि शहरांना मजबूत आर्थिक पाया देण्यासाठी हा बजेट आहे. तसेच म्युनिसिपल बॉन्ड्सना प्रोत्साहन देणे, ही सर्व पावले विकसित भारताच्या दिशेने प्रवासाला आणखी गती देतील.





