Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. फडणवीस म्हणाले की, हा अर्थसंकल्प 'विकसित भारताकडे एक दमदार पाऊल' टाकणारा असून यामुळे देशाच्या सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा होतील. विशेषतः मध्यमवर्ग, शेतकरी, युवक आणि उद्योग क्षेत्रासाठी यात करण्यात आलेल्या घोषणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चालू आर्थिक धोरणे आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनांमुळे देशाची आर्थिक प्रगती अधिक जलद होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



या अर्थसंकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हा २१ व्या शतकातील एक सर्वसमावेशक आराखडा आहे, जो ग्रामीण भागातील चित्र बदलण्यासोबतच नागरिककेंद्रीत गुंतवणूक आणि दीर्घकालीन विकासाला चालना देईल. यामुळे सामान्य नागरिकांवरील आर्थिक भार कमी होऊन देशाचे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत बनेल. या अर्थसंकल्पातून केवळ केंद्रालाच नव्हे, तर महाराष्ट्रासह विविध राज्यांनाही मोठे आर्थिक बळ मिळणार आहे. केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढल्यामुळे विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य नागरिक तसेच व्यावसायिकांसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत फायदेशीर ठरेल. एकंदरीत, हा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक विकासाची गती वाढवणारा आणि देशाला जागतिक स्तरावर अधिक सक्षम करणारा ठरेल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

Comments
Add Comment

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि

Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या

मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार,