राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही पाटील चालेल, पण पटेल नको

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू असून आज दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असं मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आल्याने पक्षसंघटनेला त्या कितपत वेळ देऊ शकतील, असा मुद्दा पुढे करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही." दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतात, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढे जाते का, पक्षाला नवं नेतृत्व मिळणार की प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Monsoon News : मान्सून केरळमध्ये दाखल! देशातील १८ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची इशारा

मुंबई : दक्षिण-पश्चिम मान्सूनने (Monsoon) अखेर केरळमध्ये (Kerala) अधिकृत प्रवेश केला असून आता त्याचा वेग वाढला आहे. केरळनंतर

जेम पोर्टलवरून शालेय वस्तुंची खरेदी करताच काँग्रेसला लागल्या मिरच्या

- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी - मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी

World Environment Day 2026 : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे होणार १६ हजार वृक्षांची लागवड

- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ - मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More Controversy : बिग बॉस 19 चा स्पर्धक आणि प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडला आहे.