Ajit Pawar Plane Crash Video Live : विमान झुकलं, आदळलं अन् क्षणात....अजितदादांच्या विमान अपघाताचा लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज समोर

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी 'दादां'नी जगाचा निरोप घेतल्याने राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह विमानात असणाऱ्या इतर सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आता या विमान अपघाताचा पहिला सीसीसीटीव्हीचा विडिओ समोर आला आहे.



विमान अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या शेतात हे विमान कोसळले, त्या शेताजवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताचा हा काळजाचा ठोका चुकवणारा घटनाक्रम कैद झाला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असल्यानुसार, हे खाजगी जेट विमान कोसळण्यापूर्वी काही वेळ आकाशात घिरट्या घालत होते. विमान लँडिंगच्या प्रयत्नात असतानाच अचानक त्याचे संतुलन बिघडले आणि ते हळूहळू जमिनीच्या दिशेने येऊ लागले. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी विमान शेतात आदळले आणि त्याच क्षणी एका प्रचंड मोठ्या स्फोटासह विमानाने पेट घेतला. अपघाताचा आवाज इतका भयानक होता की, आजूबाजूच्या ३-४ किलोमीटर परिसरात मोठा आवाज ऐकू आला. सीसीटीव्हीमधील दृश्यांवरून अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे. आकाशातून खाली येताना विमानावर वैमानिकाचे नियंत्रण नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असून, काही सेकंदातच विमानाचा अक्षरशः अग्नीगोळा झाला. प्रशासनाकडून या सीसीटीव्ही फूटेजची आता सखोल चौकशी केली जात आहे.



विमान कोसळल्यानंतरही स्फोट झाले


एका बाजूने झुकलेलं हे विमान एका शेतात जाऊन कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. स्फोट होतच विमान खाली कोसळत असल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विमान जमीनीवर पडल्यानंतरही स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. आजूबाजूच्या लोकांना काही सेकंद लागली नेमकं काय झाले आहे हे काळायला.



VT-SSK... 'त्या' दुर्दैवी विमानाची सर्व माहिती समोर...


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता ज्या विमानाने त्यांचा शेवटचा प्रवास झाला, त्या विमानाचे तांत्रिक तपशील समोर आले आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले हे विमान क्षणात अग्नीगोळा कसे झाले, यावर आता तज्ज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवार ज्या विमानाने बारामतीला निघाले होते, ते VSR (व्हीएसआर) या प्रसिद्ध खाजगी विमान कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट ४५ (Learjet 45) – हे जेट प्रामुख्याने उद्योगपती आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या खाजगी प्रवासासाठी वापरले जाते. VT-SSK व्ही. के. सिंग हे कंपनीचे मालक आहेत. या विमानाचे सारथ्य अनुभवी कॅप्टन रोहित सिंग करत होते. लिअरजेट ४५ हे विमान त्याच्या वेगासाठी आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेसाठी ओळखले जाते. मात्र, अशा प्रगत विमानाचा अपघात होणे ही एक गंभीर बाब मानली जात आहे. या दुर्घटनेत कॅप्टनसह विमानातील पाचही प्रवाशांचा अंत झाला आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा