Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता वैष्णोदेवीच्या यात्रेला बसला आहे. त्रिकुटा पर्वतावर सातत्याने होत असलेला पाऊस आणि मोठ्या प्रमाणावरील हिमवृष्टीमुळे भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून 'श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डा'ने यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना सध्या कटरा येथेच थांबवून ठेवण्यात आले आहे.





निसरडे रस्ते आणि भूस्खलनाचा धोका


त्रिकुटा पर्वत परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे डोंगरावरील रस्ते निसरडे झाले असून चालणे कठीण झाले आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे दृश्यमानता (Visibility) कमी झाल्याने आणि रस्त्यावर घसरण वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने तातडीने चढाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. वातावरणातील बदल आणि कडाक्याची थंडी लक्षात घेता, उत्तर हिंदुस्थानातून येणाऱ्या प्रवाशांची नवीन तिकीट नोंदणी (Registration) सध्या पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. कटरा येथील तिकीट काऊंटरवर गर्दी होऊ नये आणि भाविकांची गैरसोय टाळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान सुधारल्याशिवाय कोणत्याही नवीन यात्रेकरूला दर्शनासाठी वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.



हवामान खात्याचा ३६ तासांचा इशारा


हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ३६ तास जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागांत पावसाचा जोर आणि हिमवृष्टी कायम राहणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) वातावरणात हा बदल झाला असून, थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. जसा पाऊस आणि बर्फवृष्टीचा जोर कमी होईल आणि रस्ते प्रवासासाठी सुरक्षित होतील, तशी यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. सध्या कटरा आणि आधारभूत शिबिरांमध्ये (Base Camps) भाविकांसाठी राहण्याची आणि जेवणाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना

Twisha Sharma Case : ७ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई! सासू गिरिबाला सिंह अटकेत; सीबीआयचा तपास वेगात

ट्विशा शर्मा मृत्यू  (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय