जागतिक अर्थव्यवस्थेची माहितीही महत्वाची

विरोधकांच्या टीके फडणवीस यांचे उत्तरला


नवी दिल्ली : जगातील राजकीय नेते इथे आहे. जगातील उद्योगांचे नेतृत्व करणारे इथे आहेत. जगातील नवीन शोध या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता या ठिकाणी दाखवण्यात आल्या आहेत. जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, हे आपल्याला इथे शिकायला आणि त्यात सहभागी व्हायला देखील मिळते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दावोस दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले. दावोस येथून संवाद साधत त्यांनी सध्याची भू-राजकीय परिस्थिती, आर्थिक घडामोडी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील सहभाग याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यात झालेल्या करारामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या गुंतवणुकीबद्दलही
माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून बोलताना म्हणाले की, ‘पहिल्यांदा तर मला हे सांगायचे आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमधील सहभाग का गरजेचा आहे. आपल्याला कल्पना आहे की, आजच्या भू-राजकीय परिस्थितीत ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर सुंसगत राहायचे असेल, तर तुम्हाला दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये
असले पाहिजे.’
‘देशाचे ग्रोथ इंजिन असलेला महाराष्ट्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलेच पाहिजे. ती संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. या ठिकाणी दोन गोष्टी असतात. एक आपला सहभाग असतो. ज्यात द्विपक्षीय बैठका होतात. उद्योगपतींसोबत बैठका होतात. वेगवेगळ्या संवादात भाग घेऊन आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते. त्या क्षेत्रातील जे जे नवीन घडत आहोत, त्यात आपण सध्या कुठे आहोत, या गोष्टी आपल्याला सांगता येतात. त्याचबरोबर अनेक गुंतवणुकीचे करारही या ठिकाणी होतात’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Comments
Add Comment

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात

चारही पीठांचे शंकराचार्य १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार

दिल्लीत गोमाता रक्षणासाठी १० मार्चला कार्यक्रम नवी दिल्ली: ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद