दावोसमध्ये कोकणासाठी तीन लाख कोटींचे अकरा करार

रत्नागिरी : दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३७ कोटी २७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली असून कोकणात ३ लाख कोटींचे ११ करार झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार झाले होते. मागील दोन दिवसांत ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटींचा करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.


आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात ५१ करार झाले आहे. यामध्ये एमआयडीसीसोबतच एमएमआरडीए, सिडको यांचाही समावेश आहे. एमएमआरडीएमध्ये १९ तर सिडकोसोबत ६ करार झाला आहे. मागील दोन दिवसात८१ करार झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणासाठी ११ करार झाले असून त्यात ३ लाख ८१० कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. यात आयटी, डेटा सेंटर्स, ईव्ही ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिफेन्स, डिजिटल इन्फ्रा सारखे उद्योग असणार आहेत.

Comments
Add Comment

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या