टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी


मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने टोल वसुली अधिक पारदर्शक आणि कडक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, आता वाहनावर टोलची थकबाकी असल्यास त्या वाहनासाठी अनापत्ती प्रमाणपत्र (एनओसी), फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण तसेच राष्ट्रीय परवाना (नॅशनल परमिट) मिळणार नाही.


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन (द्वितीय सुधारणा) नियम, २०२६’ अधिसूचित केले असून, त्यामुळे केंद्रीय मोटार वाहन नियमावली, १९८९ मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नियमांचा मुख्य उद्देश इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली अधिक सक्षम करणे आणि टोल चुकवेगिरीला पूर्णविराम देणे हा आहे. नव्या नियमांनुसार, जर इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीमध्ये एखाद्या वाहनावर ‘अनपेड यूजर फी’ म्हणजेच न भरलेला टोल नोंदलेला असेल, तर त्या वाहनाशी संबंधित अत्यावश्यक सेवा थांबवण्यात येतील. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६ अंतर्गत जो टोल आकारला जातो, तो न भरल्यास तो ‘अनपेड यूजर फी’ म्हणून गणला जाईल.


आता वाहन विक्रीसाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन हस्तांतरासाठी आवश्यक असलेले एनओसी, संपूर्ण टोल थकबाकी भरल्याशिवाय दिले जाणार नाही. त्याचप्रमाणे, वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरणही टोल थकबाकी असल्यास होणार नाही. व्यावसायिक वाहनांसाठी राष्ट्रीय परवाना मिळवणे किंवा तो कायम ठेवणेही आता टोल भरण्याशी जोडण्यात आले आहे.


हा निर्णय भविष्यात लागू होणाऱ्या ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (एमएलएफएफ) टोल प्रणालीच्या तयारीचा भाग आहे. या प्रणालीत टोल नाक्यांवर कोणतेही अडथळे (बॅरिअर) नसतील आणि वाहने न थांबता पुढे जातील, तर टोल आपोआप वसूल केला जाईल. त्यामुळे नियम अधिक कडक करून कोणीही टोल चुकवू नये, याची खात्री केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :