Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली आहे. ही योजना आता आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांना थेट फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, मजूर, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल पेन्शन योजना ही अशाच घटकांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता मिळावी,या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. अटल पेन्शन योजनेची सुरुवात मे २०१५ मध्ये करण्यात आली. नियमित गुंतवणुकीच्या माध्यमातून ६० वर्षांनंतर निश्चित पेन्शन मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शासकीय आकडेवारीनुसार, १९ जानेवारी २०२६ पर्यंत या योजनेत ८.६६ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. ही संख्या योजनेवरील वाढता विश्वास दर्शवते.

या योजनेत सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान १,००० ते कमाल ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. गुंतवणुकीच्या रकमेनुसार पेन्शनची रक्कम ठरते. त्यामुळे वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.

विशेषतः ग्रामीण भाग, छोटे गाव आणि लहान शहरांमधील मजुरांसाठी अटल पेन्शन योजना वरदान ठरत आहे. अशा घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. २ पासून सरकारकडून या योजनेबाबत सातत्याने जनजागृतीही केली जात आहे.
Comments
Add Comment

कर्नाटकात लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

नवी दिल्ली: कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे

Sukhoi Su-30 MKI Crashes: Su-30MKI विमान अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद

दिल्ली: आसामच्या दाट जंगलात बेपत्ता झालेल्या त्या 'सुखोई-३०' विमानाबाबतची भीती अखेर खरी ठरली आहे. तासनतास सुरू

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडून पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी