Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली आहे. ही योजना आता आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांना थेट फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, मजूर, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल पेन्शन योजना ही अशाच घटकांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता मिळावी,या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. अटल पेन्शन योजनेची सुरुवात मे २०१५ मध्ये करण्यात आली. नियमित गुंतवणुकीच्या माध्यमातून ६० वर्षांनंतर निश्चित पेन्शन मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शासकीय आकडेवारीनुसार, १९ जानेवारी २०२६ पर्यंत या योजनेत ८.६६ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. ही संख्या योजनेवरील वाढता विश्वास दर्शवते.

या योजनेत सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान १,००० ते कमाल ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. गुंतवणुकीच्या रकमेनुसार पेन्शनची रक्कम ठरते. त्यामुळे वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.

विशेषतः ग्रामीण भाग, छोटे गाव आणि लहान शहरांमधील मजुरांसाठी अटल पेन्शन योजना वरदान ठरत आहे. अशा घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. २ पासून सरकारकडून या योजनेबाबत सातत्याने जनजागृतीही केली जात आहे.
Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी