Mumbai Bellasis Bridge : मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतुक कोंडीला दिलासा;मुंबई सेंट्रलमधील हा ब्रिज सुरु होणार...

मुंबई: मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल येत्या २६ जानेवारीपासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अवघ्या १५ महिने आणि सहा दिवसांत या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने महापालिका आणि मध्य रेल्वेच्या यशस्वी समन्वयाचे हे कौतुकस्पद उत्तम उदाहरण मानले जात आहे. .

मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन जुना बेलासिस पूल धोकादायक घोषित करण्यात आले होते त्यांनंतर त्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले, तर १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. निविदेनुसार पुलाच्या कामासाठी अजून चार महिन्यांची मुदत शिल्लक असतानाच हे काम वेळेआधी पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेचा पूल विभाग आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन करत कामाची विभागणी केली. रेल्वे रुळावरील कामे मध्य रेल्वेने पूर्ण केली, तर गर्डरचे मजबुतीकरण, स्लॅब कास्टिंग, पुलाचा पृष्ठभाग आणि पोहोच मार्गाची कामे महापालिकेने पार पाडली.

या प्रकल्पादरम्यान बेस्ट वाहिन्यांचे स्थलांतर, अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पुनर्वसन, एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हटवणे तसेच उच्च न्यायालयातील खटल्यासारखी आव्हाने समोर आली. मात्र, सर्व अडचणींवर मात करत कामात कोणताही विलंब होऊ दिला गेला नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित