मुंबईत उबाठाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का, 'या' पहिल्या महिला नगरसेविकाचा होणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाला मुंबईत पहिलाच मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या उबाठाच्या अधिकृत बैठकींपासून दूर राहिल्याने आणि हालचालींमध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून हालचालींना वेग आला असताना, इतर पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क वाढवला जात असल्याची चर्चा आहे. अशाच पार्श्वभूमीवर डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे उबाठाच्या नगरसेवकांची बैठक आणि गटनोंदणीसाठी नवी मुंबईला जाण्याच्या प्रक्रियेत त्या अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक वाढला आहे.


डॉ. सरिता म्हस्के यांनी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा हा संभाव्य निर्णय उबाठासाठी धक्का मानला जात आहे. जर त्या अधिकृतपणे गट बदलल्यास उबाठाच्या नगरसेवकांची संख्या कमी होऊन पक्षाची ताकद कमी होणार आहे.


मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवलीतही काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने उबाठाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील राजकारण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत सत्तासमीकरणे नेमकी कुठल्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Chief Minister Devendra Fadnavis : मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार

मुंबई : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

FIFA2026 : फिफा विश्वचषक २०२६: मैदानावर भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा

FIFA World Cup 2026 : फुटबॉलच्या महाकुंभात, म्हणजेच २०२६ फिफा विश्वचषकात केवळ देशच एकमेकांविरुद्ध लढत नाहीत, तर विविध

Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य

Labor Minister Adv. Akash Fundkar : राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून

Minister Radhakrishna Vikhe-Patil : प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'मराठा आरक्षण कक्ष' स्थापन करणार

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील; न्यायमूर्ती शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई : मराठा आरक्षणाच्या