मुंबईत उबाठाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का, 'या' पहिल्या महिला नगरसेविकाचा होणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाला मुंबईत पहिलाच मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या उबाठाच्या अधिकृत बैठकींपासून दूर राहिल्याने आणि हालचालींमध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून हालचालींना वेग आला असताना, इतर पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क वाढवला जात असल्याची चर्चा आहे. अशाच पार्श्वभूमीवर डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे उबाठाच्या नगरसेवकांची बैठक आणि गटनोंदणीसाठी नवी मुंबईला जाण्याच्या प्रक्रियेत त्या अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक वाढला आहे.


डॉ. सरिता म्हस्के यांनी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा हा संभाव्य निर्णय उबाठासाठी धक्का मानला जात आहे. जर त्या अधिकृतपणे गट बदलल्यास उबाठाच्या नगरसेवकांची संख्या कमी होऊन पक्षाची ताकद कमी होणार आहे.


मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवलीतही काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने उबाठाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील राजकारण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत सत्तासमीकरणे नेमकी कुठल्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : प्रियसीनेच केली प्रियकराची हत्या : धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे(pune) : पुण्यामध्ये एक धक्कादायक आणि विचीत्र असा प्रकार उघडकीस आला आहे . आजकालच्या जीवनात कोणावर विश्वास

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Rohit Sharma : रोहित शर्माला पद्मश्री तर टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा