शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी


नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी प्रकरण आता एका मोठ्या राजकीय आणि धार्मिक वादात सापडले आहे. मंदिराच्या द्वारपाल आणि इतर पवित्र वास्तूंवर सोन्याच्या मुलामा चढवण्यात अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणात सक्रिय झाले आहे.


ईडीने मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास अधिक तीव्र केला आहे आणि केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील सुमारे २१ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत केली जात आहे. केरळ पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने यापूर्वी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.


केरळ उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) मंदिरातून सोन्याच्या कथित गैरव्यवहाराची फौजदारी चौकशी करत असताना हे छापे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत, एसआयटीने या प्रकरणात १३ जणांना अटक केली आहे, ज्यात मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवारू यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


मुख्य आरोपीच्या जागेवरही छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी बंगळूरुमध्ये मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोटी आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी)चे माजी अध्यक्षए. पद्मकुमार यांच्याशी संबंधित जागेवरही छापे टाकत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे केरळ विधानसभेतही मोठा गोंधळ उडाला, ज्यामुळे सरकार, देवस्वोम बोर्ड आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाले.

Comments
Add Comment

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.