राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रालयातून समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ दिसण्यासाठी सरकारच मोठं पाऊल ..

मुंबई : मुख्य मंत्रालय सरकारी कामासाठी अपुरे पडत आहे. याशिवाय जागा कमी असलयाने मंत्रयांची गैरसोयही होत आहे. जुन्या इमारतीतून दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजाराही पाहता येत नसल्याने, नवी इमारत बांधणायचे काम सरकारने हाती घेतले आहे. या कामाला आता वेग आला असून मुख्य पाच माजली इमारत ही बांधली जाणार आहे.


राज्य सरकारने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला लागून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्यांनी सात मजली इमारत बांधण्याचे नियोजन केले होते परंतु,हेरिटेज समितीचा आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयाने मंत्रालय परिसरातील इमारतींना घालून दिलेली २४ मीटर उंचीची मर्यादा यामुळे नवी इमारत पाच मजली बांधण्याचा निर्णय झाला.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची दलाने आहेत. याशिवाय सचिवांचीही कार्यालये आहेत. येथून समुद्रकिनारा दिसतो. नव्या इमारतीचा पाचवा मजला बांधला की, समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ मंत्रालयातून दिसणार नाही. त्यामुळे नवी इमारत पाचऐवजी चारच मजल्यांची बांधावी, असे सरकारच्या विचाराधीन आहे. त्या दृष्टीने गंभीर चर्चाही सुरू आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याने तूर्त चार मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही समजते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. त्यानुसार मंत्रालयाची नवी इमारत १०० दिवसांत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी इमारत बांधकामाचा कार्यादेश १ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष सुरू करताना अनेक अडचणी आल्याने बांधकाम विभागाला १०० दिवसांत इमारत बांधून पूर्ण करणे शक्य झाले नाही. आता येत्या ३० एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण करून महाराष्ट्र दिनी इमारतीचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Death Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तीन प्रत्यक्षदर्शी चिमुकल्यांची महत्त्वाची साक्ष!

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या धक्कादायक प्रकरणात

India-Nepal Border Issue : भारत – नेपाळ सीमा प्रश्नावर भारताने नाकारला तृतीय पक्षाचा सहभाग

- युरोपीयन युनियन व पाकिस्तान संयुक्त निवेदन भारताने फेटाळले नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)

Farmers Loan Waiver Maharashtra : महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, पण 'या' पदाधिकाऱ्यांना मिळणार नाही लाभ

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या

Illegal Liquor News : दारू माफियांना पोलिसांचा दणका! वसईत १६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट

वसई : पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये (Action Mode) आली असून अवैध दारू

Sewage treatment plant in Mahul : माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद?

- तब्बल दहा दशलक्ष लिटर मलजलावर केली जाते प्रक्रिया मुंबई (विशेष प्रतिनिधी) माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच्या

Participate Mumbai : नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेचा 'पार्टीसिपेट मुंबई' उपक्रम

स्वयंसेवी संस्था, स्थानिक गट, कार्पोरेट कंपन्यांचा सहभागाने मुंबईचा विकासासाठी डिजिटल व्यासपीठ मुंबई : मुंबई