मुंबई महापौर पदावरून उबाठाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. मात्र महापौर पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उबाठाचे नगरसेवक नॉटरिचेबल झाल्यामुळे मुंबईतील ६५ नगरसेवकांवर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे. विरोधी पक्षात बसावे लागणाऱ्या उबाठातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्यावर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे.


भाजपचे यंदा पालिकेत सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज आहे. उबाठाकडून महापौर पदाची जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्रे येथील एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. मात्र, यावरून हॉटेल पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली. मित्रपक्ष भाजपनेही सतर्कतेची पावले उचलली असून त्यांच्या सर्व नगरसेवकांना पुढील १० दिवस मुंबईतच राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.