रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘


मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिलीच एकदिवसीय सामन्याची मालिका आहे. २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे १८ एकदिवसीय सामनेच आहेत आणि त्यापैकी ३ सामने झाले. या मालिकेतील पराभवामुळे भारताच्या वर्ल्ड कप तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्याची मालिका जिंकली होती, तरीही त्यांना किवींविरुद्ध समाधानकारक कामगिरी करता आली नाही.


मागच्यावेळेस ऑस्ट्रेलियाने भारतात एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ अशी जिंकली होती. रोहित शर्माला सलामीला आलेले अपयश, रवींद्र जडेजाची निराशाजनक कामगिरी आणि मधल्या फळीती सातत्य नसणे, यामुळे भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागली.


रोहितला पॉवर प्लेमध्ये अपयश : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला संघाला अपेक्षित सुरुवात करून देता आली नाही. त्याला तीन सामन्यांत २०.३३ च्या सरासरीने फक्त ६१ धावा करता आल्या. २६ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. रोहितच्या अपयशामुळे मधल्याफळीवर दडपण वाढले आणि तिसऱ्या व निर्णायक सामन्यात भारताने पटापट विकेट्स गमावल्या.


रवींद्र जडेजाने केले निराश : भारताचा यशस्वी अष्टपैलूंपैकी एक रवींद्र जडेजाने या मालिकेत दोन्ही आघाड्यांवर निराश केले. तिसऱ्या सामन्यात त्याने ६ षटकांत ४१ धावा दिल्या. विशेष म्हणजे ३ सामन्यांत मिळून त्याने फक्त ४३ धावा केल्या. त्याने पहिल्या दोन सामन्यांत गोलंदाजीत ४४ व ५६ धावा देताना एकही विकेट घेतली नाही. तेच फलंदाजीत त्याने २७ व ४ धावांचे योगदान दिले.


मधल्या फळीमध्ये गोंधळ : लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयश आले. बिनबाद २८ वरून भारताची अवस्था पुढील ९ षटकांत ४ बाद ७१ अशी झाली. अय्यरने ३ सामन्यांत २० च्या सरासरीने ६० धावा केल्या, तर लोकेशने ३ सामन्यांत एका शतकासह १४२ धावा केल्या.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा