तुरुंगातूनच विजयाचा गुलाल!

गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती


मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी ‘धक्कादायक’ विजयांची नोंद झाली आहे. ती म्हणजे गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या अनेक उमेदवारांनी विजय मिळवला आहे.


पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. पांगारकर यांची काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.


पुण्यामध्ये राष्ट्रवादीने आयुष कोमकर हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दोघींचा विजय झाला आहे. सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर जेलमध्ये असताना आंदेकर कुटुंबीयांकडून प्रचार केला जात होता. सध्या त्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.


अलिशा खान यांचा विजय : नागपूर महापालिका निडणुकीत पोलिसांनी नागपुरात महालसह इतर भागात उसळलेल्या दंगलीचा मास्टरमाईंड ठरवलेल्या फहीम खानची पत्नी अलिशा खान ही ‘एमआयएम’ची उमेदवार नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध

'वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला'

मुंबई : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच

'पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा'

मुंबई :  कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने

'अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी'

मुंबई : अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी

कोल्हापूरमध्ये ३४.३६ हेक्टरवर होणार आयटी पार्क

मुंबई : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन

धारावीतील ४३६ झोपडपट्टीधारकांचे देवनार येथे पुनर्वसन

मुंबई : धारावी येथे १९९९ साली लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण