मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील किसळ–पारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त दिल्ली येथे विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.


लोकसहभागातून राबवलेल्या विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याचे हे महत्त्वाचे प्रतीक मानले जात आहे. यापूर्वीही डॉ. वरे-भालके यांना “पंचायत टू पार्लमेंट” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांकडून निमंत्रणे मिळाली असून त्यांनी जागतिक व्यासपीठावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे.


ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि लोकशाही मूल्यांच्या बळकटीसाठी त्यांनी केलेले कार्य किसळ–पारगावसह संपूर्ण मुरबाड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे