परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पेटली आहे. काँग्रेसच्या मदतीने ‘उबाठा’ शिवसेना निर्विवाद बहुमतापर्यंत जाऊन पोहोचली असून भारतीय जनता पक्षाला केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या असून जनसुराज्य पक्षाला ४, यशवंत सेना १, अपक्ष १ असे महापालिकेतील पक्षीय बलाबल आहे. तब्बल २५ जागा मिळवून उबाठा शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.


काँग्रेस पक्षासोबत उबाठाची निवडणूकपूर्व आघाडी झाल्याने आणि काँग्रेसला १२ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी मिळवली होती. यावेळी वरपूडकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तरीही त्यांच्या या प्रवेशाचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही.


नांदेड मनपामध्ये भाजपाचे ‘अशोक पर्व!’


नांदेड नगर परिषद ते नांदेड-वाघाळा महानगरपालिका या प्रवासाच्या अमृतमहोत्सवी पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या शहराच्या या मध्यवर्ती संस्थेमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाला हद्दपार करत भाजपाचे कमळ फुलविण्याची अवघड मोहीम शुक्रवारी फत्ते केली. कमळ फुलल्याचा शहरभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या मनपाच्या २० प्रभागांतील ८१ जागांपैकी भाजपाने ६६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ४५ जागा जिंकून संस्मरणीय विजयाची नोंद केली. गेल्या निवडणुकीत मनपातून हद्दपार झालेल्या एमआयएमने दमदार पुनरागमन करत २४ वर्षे सत्ता गाजविणाऱ्या नेतृत्वहिन काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर फेकले आहे. दोन आमदार असूनही शिवसेनेची तसेच प्रचारादरम्यान नांदेडचा कारभारी बदलण्याचा नारा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीमध्ये धुळदाण उडाली.

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त