Saturday, January 17, 2026

BMC Election 2026 : महापालिका रणसंग्राम: 'महायुती'चा ऐतिहासिक विजय; भाजपची राज्यात मुसंडी!

BMC Election 2026 : महापालिका रणसंग्राम: 'महायुती'चा ऐतिहासिक विजय; भाजपची राज्यात मुसंडी!

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. 'मिशन महापालिका' यशस्वी करत भाजप-शिवसेना महायुतीने राज्यातील २९ पैकी तब्बल १९ महानगरपालिकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकून 'मोठा भाऊ' म्हणून आपले स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

भाजप आणि शिवसेना जागांचे संपूर्ण गणित

Municipal Corporations final party wise position

राज्यातील एकूण २,८६८ जागांपैकी महायुतीने बहुतांश जागा खिशात घातल्या आहेत:

भारतीय जनता पक्ष (BJP) : भाजपने संपूर्ण राज्यात १,४०० पेक्षा जास्त जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

शिवसेना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात ३५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे.

एकूण महायुती: या दोन्ही पक्षांच्या एकत्रित बळावर महायुतीने राज्याच्या शहरी भागावर आपले पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.

मुंबई महानगरपालिका (BMC) : २५ वर्षांचे सत्तांतर

सर्वात मोठी लढाई मुंबईत होती, जिथे महायुतीने ११४ चा बहुमताचा आकडा पार करत ११८ जागा जिंकल्या आहेत:

भाजप : ८९ जागा (मुंबईतील सर्वात मोठा पक्ष).

शिवसेना : २९ जागा. (याउलट ठाकरे गटाला ६५ आणि मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे).

१९ शहरांत भाजपचाच महापौर बसणार

राजकीय वर्चस्वाची नवी व्याख्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश हे केवळ जागांच्या संख्येपुरते मर्यादित नसून, सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यात भाजपला मोठे यश मिळाले आहे. एकूण २९ पैकी तब्बल १९ महानगरपालिकांमध्ये भाजपचाच महापौर बसण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपला मिळालेले हे निर्विवाद बहुमत हे सिद्ध करते की, राज्यातील शहरी मतदारांनी विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या मुद्द्यावर भाजपला कौल दिला आहे. सर्वात महत्त्वाची लढाई मुंबई महानगरपालिकेत होती. तिथे ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मित्रपक्षांच्या मदतीने मुंबईत प्रथमच भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईसोबतच पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत भाजपने आपल्या बळावर स्पष्ट बहुमत मिळवल्याने तिथेही भाजपचीच सत्ता असणार आहे. १९ महापालिकांमध्ये स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या भक्कम पाठिंब्याने भाजपचेच महापौर बसणार असल्याने राज्यातील प्रमुख नागरी प्रशासनावर भाजपची पकड मजबूत होणार आहे. ज्या महापालिकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी एकत्र लढण्याचा प्रयत्न केला, तिथेही भाजपच्या झंझावातापुढे त्यांचे गणित टिकू शकले नाही. १९ शहरांत भाजपचा महापौर होणे म्हणजे राज्याच्या ७० टक्क्यांहून अधिक नागरी भागाचे नियंत्रण थेट भाजपकडे जाणे होय.

'या' ठिकाणी बसणार भाजपचा महापौर

मुंबई, नवी मुंबई, उल्हासगर, मिरा भाईंदर, पनवेल, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, इचलकरंजी, जालना

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा