मुंबईत महायुतीचाच महापौर

मुंबईरांनी ठाकरेंना नाकारले, भाजप आणि शिवसेनेला स्वीकारले


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता मतपेटींतून आलेल्या निकालाने पूर्णविराम दिला आहे. मुंबईकरांनी ठाकरे ब्रॅण्डला नाकारत विकासाच्या मुद्द्यावर मत मागणाऱ्या भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. मुंबईत भाजपचे तब्बल ८८ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेचे २८. या प्रकारे महायुतीचे एकूण ११६ नगरसेवक निवडून आले आहेत. तर मागील २५ वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या उबाठाला मुंबईकरांनी सत्ते बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांचे केवळ ६५ नगरसेवक निवडून आले असून मनसेचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या बंधूंच्या युतीला केवळ ७१ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११४ च्या मॅजिक आकडा पार करण्यात महायुतीला यश आले आहे. त्यामुळे महायुतीचा महापौर रोखण्यापासून भाजप आणि शिवसेनेला कोणीच रोखून शकत नसल्याचे निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे मुंबई ठाकरेंची नसून भाजप आणि शिवसेना महायुतीचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे १३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते, त्यापैंकी ८८ उमेदवार हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने ९० जागा लढवल्या होत्या, त्यात त्यांचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. तर महायुतीचा घटक असलेल्या परंतु स्वतंत्र निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सरकारमधील महायुतीतील घटक पक्षांच्या नगरसेवकांची सख्या ११९ एवढी होणार आहे. त्यामुळे ११४च्या मॅजिकच्या आकड्याच्या पुढे निघून गेल्यामुळे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला जाऊन महायुतीचाच महापौर बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत महापालिकेत १९९७ पासून सलग शिवसेनेची सत्ता असून मागील २५ वर्षे असणाऱ्या उबाठाला आता विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.


मागील निवडणुकीत भाजपचे ८२ तर उबाठाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. त्या तुलनेत यंदा भाजपने सहा जागा अधिक मिळवल्या आहेत, तर उबाठाला १९ जागा कमी मिळवता आलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना सोंबत घेऊन दोन्ही भाऊ एकत्र येऊनही मुंबईत करिश्मा दाखवून शकले नाही. मुंबईत मराठीचा मुद्दा आणि ठाकरे ब्रँड चाललच नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.


शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ - ७२ मध्ये हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपात झाले होते. त्यानंतरपासून १९९२ पर्यंत अधूनमधून शिवसेनेचे महापौर निवडून येते होते. त्यानंतर १९९२ ते १९९६मध्ये काँग्रेसचे महापौर बनले होते. या पाच वर्षांच्या शेवटच्या काळात काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालिन शिवसेनेचे उमेदवार मिलिंद वैद्य हे महापौर म्हणून निवडून आले होते. त्यानंर १९९७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि तेव्हापासून महापालिकेत उबाठाचा महापौर निवडून येत आहे. आता २०२६ मध्ये मुंबईच्या ७८ व्या महापौरांची निवड होणार आहे. मुंबईचा हा ७८वा महापौर आता भाजप महायुतीचा होणार आहे, त्यानुसार नगरसेवक गणसंख्येची गणितेही जुळून येत आहेत.


निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रथमपासून भाजप पुढे राहिला होता आणि त्यानंतरही शेवटपर्यंत त्यांचे नगरसेवक अधिक निवडून येत पुढेच राहिले. त्यामुळे भाजपचे अंतिम निकालानंतर ८८ नगरसेवक निवडून आले, तर शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले. दुपारनंतर मॅजिक आकड्याच्या पुढे नगरसेवक निवडून आल्यांनतर भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू झाला तर उबाठा शिवसेनेच्या शिवसेना भवनजवळ गुलाल उधळला गेला; परंतु तेथील गड जिंकल्यामुळे जल्लोष झाल्याचे पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने विकासाचा मुद्दा पुढे नेत प्रचार केला होता, तर उबाठा आणि मनसेने केवळ मराठी अस्मितेला हात घालत मराठी आणि अमराठी मुद्दा हाती घेत प्रचार केला होता. त्यामुळे मुंबईकरांनी ठाकरे बंधूंच्या भावनिक मुद्द्याकडे लक्ष न घालता विकासाच्या मुद्यावर महायुतीला मतदान केल्याचे दिसून येत आहे.


संख्याबळ पक्षनिहाय


भाजप : ८८(मागील निवडणुकीतील संख्या : ८२)
शिवसेना २८(मागील निवडणुकीतील संख्या : 00)
उबाठा : ६५(मागील निवडणुकीतील संख्या : ८४)
मनसे :०६ (मागील निवडणुकीतील संख्या : ०७)
काँग्रेस : २४ (मागील निवडणुकीतील संख्या : ३१)
एमआयएम : ०८ ((मागील निवडणुकीतील संख्या : ०२)
राष्ट्रवादी काँग्रेस : ०३ ((मागील निवडणुकीतील संख्या : ०७)
राष्ट्रवादी काँग्रेस शप : ०१ ((मागील निवडणुकीतील संख्या : ००)
अपक्ष : ०२

Comments
Add Comment

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक