Kangana Ranaut : "ज्यांनी माझं घर तोडल आज त्यांच..."ठाकरेंच्या पालिका निवडणुकीतील पराभवावर कंगना रनौतची सडकून टीका

कंगना रनौत : महाराष्ट्रातील महानगर पालीक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मोठे यश मिळवत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) आपली सत्ता मिळवली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाचे बीएमसीवरील वर्चस्व नष्ट झाले असून, या निकालावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.


कंगना रनौत यांनी बीएमसी निवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने आपण अत्यंत आनंदी असल्याचे कंगनाने सांगितले. यावेळी कंगना रनौत यांनी २०२० मध्ये मुंबईतील त्यांच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली. “ज्यांनी मला गाल्या दिल्या, माझं घर पाडलं, मला महाराष्ट्र सोडण्याच्या धमक्या दिल्या, आज त्यांचाच महाराष्ट्राने साथ सोडली आहे,” असे कंगना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला विरोधी मानसिकता, धमकावण्याची संस्कृती आणि घराणेशाहीचा माज असलेल्या लोकांना जनतेने योग्य जागा दाखवली आहे.


उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीएमसीने कंगना रनौत यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बीएमसीची कारवाई “दुर्भावनापूर्ण” असल्याचे नमूद करत कंगनाच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव अंतिम?

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पुतणे समीर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याबाबत झाली

Navnath Ban : संजय राऊतांनी आधी स्वत: गाढव नाक्यावर आंदोलन करावे; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला !

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला Mumbai : आजवर संजय राऊत एकाही आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'पैशांपेक्षा प्रेमाने माणसे जिंकता येतात' म्हणत सुप्रिया सुळेंना टोला मुंबई : नवी

Sunetra Pawar : बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा...

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:-

Mantri Nitesh Rane : 'देवभाऊ'च कोकणच्या चित्रपटाचे डायरेक्टर!

मंत्री नितेश राणे; 'त्यांनी दिलेल्या जबाबदारीची मी केवळ अंमलबजावणी केली' मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

MVA : विधान परिषद निवडणुक; अर्ज माघारीवरून 'मविआ'त फूट

घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना संख्याबळाचा विसर; पुणे काँग्रेसकडून आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव मुंबई :