Kangana Ranaut : "ज्यांनी माझं घर तोडल आज त्यांच..."ठाकरेंच्या पालिका निवडणुकीतील पराभवावर कंगना रनौतची सडकून टीका

कंगना रनौत : महाराष्ट्रातील महानगर पालीक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मोठे यश मिळवत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) आपली सत्ता मिळवली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाचे बीएमसीवरील वर्चस्व नष्ट झाले असून, या निकालावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.


कंगना रनौत यांनी बीएमसी निवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने आपण अत्यंत आनंदी असल्याचे कंगनाने सांगितले. यावेळी कंगना रनौत यांनी २०२० मध्ये मुंबईतील त्यांच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली. “ज्यांनी मला गाल्या दिल्या, माझं घर पाडलं, मला महाराष्ट्र सोडण्याच्या धमक्या दिल्या, आज त्यांचाच महाराष्ट्राने साथ सोडली आहे,” असे कंगना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला विरोधी मानसिकता, धमकावण्याची संस्कृती आणि घराणेशाहीचा माज असलेल्या लोकांना जनतेने योग्य जागा दाखवली आहे.


उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीएमसीने कंगना रनौत यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बीएमसीची कारवाई “दुर्भावनापूर्ण” असल्याचे नमूद करत कंगनाच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

B. Nagendra : कर्नाटकचे मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा, मुख्यमंत्री शिवकुमार यांना धक्का

मनी लाँड्रिंगसह महामंडळातून जवळपास 90 कोटींच्या कथित चोरीचे आरोप बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के.

Nilesh Rane : 'गरज पडली तर हिंदुत्त्वासाठी कायदाही हातात घेऊ'

मुंबई : परळ-लालबाग परिसरात ईदच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या राड्यात जखमी झालेल्या मराठी तरुणाची आणि त्याच्या

Kiren Rijiju : महिला आरक्षण कायदा लवकर लागू होण्याची शक्यता, किरेन रिजिजू यांचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे संकेत

नवी दिल्ली : देशात लवकरच महिला आरक्षण कायदा लवकर लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन

Prasad Lad : मराठा समाजासाठीच्या 'जीआर'च्या अंमलबजावणीत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - प्रसाद लाड यांची माहिती

मनोज जरांगे यांच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास मुंबई : मराठा समाजाबाबतचे शासन निर्णय (जीआर)

Eknath Shinde : रिक्षा चालकांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज नाहीत!

- आशिष शेलार; मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती नाही मुंबई : रिक्षा आणि

OBC certificate : सुप्रिया सुळे, विखे पाटलांसह बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे मुंबई : जलसंपदा मंत्री