Kangana Ranaut : "ज्यांनी माझं घर तोडल आज त्यांच..."ठाकरेंच्या पालिका निवडणुकीतील पराभवावर कंगना रनौतची सडकून टीका

कंगना रनौत : महाराष्ट्रातील महानगर पालीक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मोठे यश मिळवत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) आपली सत्ता मिळवली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाचे बीएमसीवरील वर्चस्व नष्ट झाले असून, या निकालावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.


कंगना रनौत यांनी बीएमसी निवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने आपण अत्यंत आनंदी असल्याचे कंगनाने सांगितले. यावेळी कंगना रनौत यांनी २०२० मध्ये मुंबईतील त्यांच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली. “ज्यांनी मला गाल्या दिल्या, माझं घर पाडलं, मला महाराष्ट्र सोडण्याच्या धमक्या दिल्या, आज त्यांचाच महाराष्ट्राने साथ सोडली आहे,” असे कंगना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला विरोधी मानसिकता, धमकावण्याची संस्कृती आणि घराणेशाहीचा माज असलेल्या लोकांना जनतेने योग्य जागा दाखवली आहे.


उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीएमसीने कंगना रनौत यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बीएमसीची कारवाई “दुर्भावनापूर्ण” असल्याचे नमूद करत कंगनाच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

मंत्र्यांचे आदेश न जुमानणाऱ्या 'आयएएस' अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात 'जावे विनोदाच्या गावा' विशेष

पिंजऱ्यातील बिबट्यांचे दात आता राहणार सुरक्षित! लोखंडी गजांना आता 'प्लास्टिक कोटिंग' करणार; वनमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडल्यानंतर पिंजऱ्यात त्यांना होणाऱ्या शारीरिक जखमा आणि त्यातून

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार

मुंबई : आरक्षणाच्या पेचामुळे २२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या वगळता राज्यातील उर्वरित

नवेगाव-नागझिरा प्रकल्पाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका; १८५ गावांतील नागरिकांचा संभ्रम दूर

- वनमंत्री गणेश नाईक यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राच्या