राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार


मुंबई : “उद्धव ठाकरेंनी आजवरच्या कार्यकाळात मुंबई पालिकेची सत्ता विरोधकांची घरे तोडण्यासाठी वापरली. ते मुख्यमंत्री असताना दररोज मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना फोन करून राणेंचे घर तोडण्याच्या सूचना देत होते. ते राणेंचे घर तोडू शकले नाहीत. पण, आता मातोश्री-२ ची वेळ आहे”, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.


उबाठा गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. त्याविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, “ज्या शिर्केंनी छत्रपती संभाजी राजांची माहिती औरंगजेबाला दिली, त्यांच्यात आणि ठाकरे बंधूंमध्ये आणि त्यांच्या पिलावळीमध्ये काही फरक नाही. पाकिस्तानात बसलेल्या अब्बाची स्क्रीप्ट ते मुंबईत बसून वाचून दाखवत आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधूंना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. जिहाद्यांच्या मांडीला मांडी लावून, चंगेज मुलतानी, रशीद मामूची दाढी कुरवाळत हे लोक बसले होते. परंतु, हिरवी शाल पंघरणाऱ्यांना हिंदू मतदारांनी धडा शिकवला. त्यामुळे संजय राऊत यांना थोडा वेळ द्या, कालचा इफेक्ट आहे. त्यांनी बॅग पॅक करून निघावे आता”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.


मुंबईतील हिंदू एकत्र आले, त्याचा परिणाम महायुतीच्या विजयात झाला. बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईतील वाढलेली संख्या कमी करण्यासाठी आम्हाला सत्ता द्या, अशी विनंती आम्ही मुंबईकर मतदारांना केली होती. आता पुढची पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात या सगळ्या गोष्टी करू. अनधिकृत हिरवी चादरी असलेल्या ठिकाणी देवभाऊ यांचा बुलडोझर चालेल. परंतु, हिंदूंनी यापुढच्या निवडणुकांमध्येही विचारपूर्वक मतदान केले पाहिजे. कारण, आपल्यात फूट पडत राहिली, तर असे ‘एमआयएम’सारखे कट्टरतावादी गळे वर काढत राहतील, असे आवाहन देखील राणे यांनी केले.


मुंबई जिहाद्यांच्या घशात जाण्यापासून वाचली


‘आय लव्ह महादेव’ विचारांचा, ‘जय श्रीराम’ म्हणणारा, हिंदू-मराठी महापौर मुंबईत बसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या व्हिजनवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले. आता ‘जय श्रीराम’ म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर मुंबईच्या खुर्चीवर बसवू, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.


भाजपवाले मुंबई आता अदानीच्या घशात घालतील, अशी टीका उबाठाने केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, मुंबई चंगेज मुलतानीच्या घशात घातलेली चालेल, मुंबईत बुरखेवाली महापौर बसत असेल, तेही चालेल. पण, जर अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होत असेल, तर ते यांना चालत नाही. मुंबई जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा, मुंबईच्या विकासासाला जे हातभार लावतील, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही काम करू, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : गावदेवी मार्केट आग, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

ठाणे : शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका

Egg Donation Case : तब्बल ३७ वेळा स्त्री बीज दान, बदलापूर प्रकरणी ५ हजार पानांचे आरोपपत्र ; १५ जणांवर गुन्हा

उल्हासनगर  : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा स्त्री बीज दान प्रकरणाच्या तपासादरम्यान एका महिलेने तब्बल ३७

Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ

UPSC च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष २०२७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

USA Invest In India : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये आगामी काळात "मोठ्या घडामोडी" घडणार असल्याचे