बेरोजगारी लादू इच्छिणाऱ्या ठाकरे बंधूंना घरी बसवा

भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांचा घणाघात


मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार निर्मितीच्या विरोधात आहेत, अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली. बुलेट ट्रेनला दोघांचाही विरोध म्हणजे ९० हजार रोजगारांना विरोध आहे. नाणार प्रकल्पाला विरोध म्हणजे जवळपास दीड लाख रोजगाराला विरोध असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली होती. या प्रकल्पाला दोन्ही ठाकरेंचा विरोध होता. वाढवण बंदराला दोघांचाही विरोध असल्याचे शेलार म्हणाले.


बेरोजगारी लादू इच्छितात त्या ठाकरेंना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याची टीका शेलारांनी केली. इथे गुंतवणूक आली तर त्याला पिटा.


उद्योजक विरोधी, युवक विरोधी आणि कामगार विरोधी यांची भूमिका असल्याचे शेलार म्हणाले. पुरावा आम्हाला नका देऊ, संबंधित आयोगाला तर द्या. अयोग्य अनाठायी असं काही असेल तर तक्रार करा ना. नेपथ्यात एक्सपर्ट आहातच, सादरीकरण पण चांगलं करा ना. आम्ही अदानी कंपनीची वकिली करत नाही असे शेलार म्हणाले. आयसीआयसीआय बॅंकेचा नफा एक हजार कोटींनी वाढला मग काय सरकारचा हात आहे म्हणायचं का? मूळात सल्लागार कशी वाट लावू शकतात हे दिसते, असे शेलार म्हणाले.


राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावे


राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावे, असे मंत्री शेलार म्हणाले. त्या आधारे बोलले की कशी अडचण निर्माण होते. आता त्यांना स्पष्टीकरण द्यायला लागत आहे की, मी अदानी समूहाचा वकील नाही. शरद पवार यांनी अदानींना हात दिला त्यांना का नाही प्रश्न विचारत? असा सवाल शेलारांनी केला. मात्र आमच्यावर दोषारोपण करणार असाल तर मला उत्तर द्यावे लागेल, असे शेलार म्हणाले. ३७ वर्षांपासून अदानी काम करत आहेत. मग १० वर्षं आणली कुठून? असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना केला. वेठीस धरू नये, मुद्दा बरोबर पण जागा चुकीची आहे. देशात स्पर्धा आयोग आहे, त्यांचे कामच हे आहे की व्यावसायिक मोनोपॉली होऊ नये म्हणून तक्रार करता येते, त्यांनी तक्रार केली आहे का? न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावर जामीन मिळतो असे शेलार म्हणाले. एखादा प्रकल्प प्रोजेक्ट प्रकल्प कायदेशीर प्रक्रियेत जपून होत असेल किंवा नसेल तर आयोगात तक्रार करा ना असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया