मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?


मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होईल. काही ठिकाणी मकरसंक्रांतीला 'उत्तरायण' असे म्हणतात तर काही ठिकाणी 'खिचडी' असेही म्हणतात. मकरसंक्रांतीनिमित्त पवित्र नदीत स्नान करतात नंतर सूर्यदेवाची उपासना करतात.


सूर्याने मकर राशीत प्रवेश करताच महिनाभर सुरू असलेला खरमास संपतो. पुन्हा एकदा शुभ कार्यांचा काळ सुरू होतो. ऋतू परिवर्तन होते. वातावरणातील थंडावा हळू हळू कमी होऊ लागतो. वसंत ऋतूची सुरुवात होते.


मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाणी स्नान करुन सूर्याची उपासना केल्यानंतर खिचडी खाणे, खिचडी दान करणे असे केले जाते. या दिवशी खिचडीचे दान केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात स्थैर्य येते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.



अशी तयार करतात मकरसंक्रांतीनिमित्त खायची मुगाची खिचडी ?


साहित्य : मूग डाळ, तांदूळ, तूप, जीरे, हिंग, धने पूड, चवीपुरते मीठ


पाककृती :




  1. तांदूळ आणि मूग डाळ धुवा. किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.

  2. तांदूळ आणि डाळीतील पाणी गाळून घ्या.

  3. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंगाची फोडणी द्या.

  4. जीरे तडतडू लागले की त्यात तांदूळ आणि मूगडाळ मिक्स करून चांगले परतून घ्या.

  5. भांड्यामध्ये पाणी ओता आणि तापवा. पाणी पूर्णपणे आटू देऊ नका. नंतर त्यात धने पूड आणि मीठ टाका.

  6. भांड्यावर झाकण ठेवा. नंतर मंद आचेवर खिचडी किमान दहा मिनिटे शिजवा.


Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी