मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?


मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होईल. काही ठिकाणी मकरसंक्रांतीला 'उत्तरायण' असे म्हणतात तर काही ठिकाणी 'खिचडी' असेही म्हणतात. मकरसंक्रांतीनिमित्त पवित्र नदीत स्नान करतात नंतर सूर्यदेवाची उपासना करतात.


सूर्याने मकर राशीत प्रवेश करताच महिनाभर सुरू असलेला खरमास संपतो. पुन्हा एकदा शुभ कार्यांचा काळ सुरू होतो. ऋतू परिवर्तन होते. वातावरणातील थंडावा हळू हळू कमी होऊ लागतो. वसंत ऋतूची सुरुवात होते.


मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाणी स्नान करुन सूर्याची उपासना केल्यानंतर खिचडी खाणे, खिचडी दान करणे असे केले जाते. या दिवशी खिचडीचे दान केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात स्थैर्य येते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.



अशी तयार करतात मकरसंक्रांतीनिमित्त खायची मुगाची खिचडी ?


साहित्य : मूग डाळ, तांदूळ, तूप, जीरे, हिंग, धने पूड, चवीपुरते मीठ


पाककृती :




  1. तांदूळ आणि मूग डाळ धुवा. किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.

  2. तांदूळ आणि डाळीतील पाणी गाळून घ्या.

  3. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंगाची फोडणी द्या.

  4. जीरे तडतडू लागले की त्यात तांदूळ आणि मूगडाळ मिक्स करून चांगले परतून घ्या.

  5. भांड्यामध्ये पाणी ओता आणि तापवा. पाणी पूर्णपणे आटू देऊ नका. नंतर त्यात धने पूड आणि मीठ टाका.

  6. भांड्यावर झाकण ठेवा. नंतर मंद आचेवर खिचडी किमान दहा मिनिटे शिजवा.


Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित