राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास


ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, या सर्व महापालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. अंबरनाथ नगर परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आज नवी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला.


यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “या सर्व नगरसेवकांशी आम्ही सविस्तर चर्चा केली. निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतो आणि आपल्या प्रभागातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील असतो. विकासात्मक कामांना गती मिळावी, हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच हे नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत