यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारीच सादर होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता


नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने बुधवारी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता दिली आहे. संसदीय दिनदर्शिकेनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करतील.


या आधी २८ फेब्रुवारी १९९९ रोजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्या दिवशी अर्थसंकल्पाची वेळ बदलण्यात आली होती. जुनी परंपरा मोडत त्यावेळी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर केला
गेला होता.


विकसित भारतावर भर


२०२६-२७ चा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण तो जागतिक तणाव आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफच्या भीतीच्या दरम्यान आला आहे. आर्थिक विकासाला परिणामी, पाठिंबा देण्यासाठी आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारताचा दर्जा राखण्यासाठी सरकारने मोठे आर्थिक सुधारणा उपाय हाती घेण्याची अपेक्षा आहे. सरकारचे “विकसित भारत” हे ध्येय लक्षात घेऊन अर्थसंकल्प व धोरणांचे विषय निवडण्यात आले आहेत. १ फेब्रुवारीला पेटाऱ्यात काय अहो, ते स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त