यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारीच सादर होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता


नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने बुधवारी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता दिली आहे. संसदीय दिनदर्शिकेनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करतील.


या आधी २८ फेब्रुवारी १९९९ रोजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्या दिवशी अर्थसंकल्पाची वेळ बदलण्यात आली होती. जुनी परंपरा मोडत त्यावेळी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर केला
गेला होता.


विकसित भारतावर भर


२०२६-२७ चा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण तो जागतिक तणाव आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफच्या भीतीच्या दरम्यान आला आहे. आर्थिक विकासाला परिणामी, पाठिंबा देण्यासाठी आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारताचा दर्जा राखण्यासाठी सरकारने मोठे आर्थिक सुधारणा उपाय हाती घेण्याची अपेक्षा आहे. सरकारचे “विकसित भारत” हे ध्येय लक्षात घेऊन अर्थसंकल्प व धोरणांचे विषय निवडण्यात आले आहेत. १ फेब्रुवारीला पेटाऱ्यात काय अहो, ते स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला